मुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार केला आहे. हा मसुदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवण्यात येणार असून त्यांनी मसुद्याला मंजुरी देताच राज्यात महाआघाडीचं सरकार स्थापन होईल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काही दिवसातच राज्यातील सत्तेची कोंडी फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.