Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

najarkaid live by najarkaid live
October 5, 2022
in अग्रलेख
0
धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…
ADVERTISEMENT
Spread the love

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली होती. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आलेल्या या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी यांच्यासह ‘बौद्ध’ धम्म स्वीकारला धम्म दिक्षा सोहळा दोन दिवस पार पाडला.धम्म स्वीकारण्यासाठी येणारे अनुयायी ‘बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार‘ अशा घोषणा देत नागपुरात दुमदुमल्या होत्या.

 

बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी विजयादशमीचा दिवस का निवडला 

इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा घेत मोठी धम्मक्रांती केली.

 

 

वियादशमीचा त्या दिवशी तारीख होती १४ ऑक्टोबर १९५६ या वेळी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन हिंदू धर्मातून बाहेर पडत बौद्ध धम्म स्वीकारला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीमुळे नागपुराला नवी ओळख मिळाली तेव्हा पासून दिक्षाभूमी म्हणून ओळखली जाते.

धर्मचक्रअनुप्रवर्तन दिन म्हणून उत्सव साजरा होतो 

धर्मचक्रअनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध उत्सव आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो. लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी नागपूर येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात.

 

नागपूर शहराची निवड करण्यामागे होतं हे कारण…

बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी ‘दीक्षासमारंभ’ कार्यक्रमाकरिता  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर शहराचे स्थळ निवडण्यामागे सुद्धा कारण होतं ते म्हणजे बुद्धधर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान कऱण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली.

 

‘या’ पत्रकातून जाहीर केली धर्मांतराची तारीख

धर्मांतरासाठी डॉ. बाबासाहेबानी २३सप्टेंबर १९५६ रोजी  एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकातून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं. तीन दिवस आधीच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी ११ ऑक्टोबरला नागपुरात आले. बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अनुयायी गावागावातून, खेड्यापाड्यातून लाखोच्या संख्येने नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून बौद्ध धम्म स्वीकारला.’बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार’ अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्याआणि वयोवृद्ध भिक्खु महास्थविर चंद्रमणी यांच्या कडून धम्म दिक्षा घेतली.


Spread the love
Tags: # जय छत्रपती शिवाजी महाराज#अशोक विजयादशमी#जय भवानी#जयभिम#डॉ. बाबासाहेब आंबेडकर#दिक्षा भूमी#बौद्ध धम्मनागपूर
ADVERTISEMENT
Previous Post

दसऱ्याच्या निमित्ताने पेट्रोल-डिझेलच्या दरात घट? त्वरित जाणून आजचे दर

Next Post

दसरा मेळाव्यांविषयीची उत्सुकता शिगेला; आज शाब्दिक तोफा धडाडणार

Related Posts

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

December 4, 2024
कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

December 31, 2022

अहंकार मुक्त गावकी आणि भावकी..!

October 28, 2020
सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

October 1, 2020
कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

May 6, 2020

कोरोनाशी लढतांना – “अंतर” महत्त्वाचे !

April 29, 2020
Next Post
उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा जसंच्या तसं पत्र

दसरा मेळाव्यांविषयीची उत्सुकता शिगेला; आज शाब्दिक तोफा धडाडणार

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us