मुंबई- तब्बल २१ दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागली असली तरी युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं जुळवाजुळव सुरूच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांमध्ये प्रामुख्यानं ‘जोरबैठका’ सुरू आहेत. तर, सत्तास्थापनेच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेलेला भाजप या सर्व घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.