Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक

najarkaid live by najarkaid live
November 14, 2019
in राज्य, राजकारण
0
राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई- अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार  बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. 

परतीच्या पावसामुळं यंदा राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या अनेक भागांत पिके अक्षरश: वाहून गेली आहेत. मात्र, सत्ता स्थापनेच्या घोळामुळं प्रशासनाचं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष झाल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी आज राजभवनावर धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं. एरवी गनिमी काव्यानं व अचानक आंदोलन करणाऱ्या कडू यांनी यावेळी जाहीर आंदोलन केलं. त्यामुळं पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे हा मोर्चा राजभवनवर जाण्याआधीच अडवला गेला. त्यामुळं शेतकरी अधिकच आक्रमक झाले. सरकार नंतर स्थापन करा आणि आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. तरुणांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

राज्यपाल फक्त राजभवनात बसण्यासाठी आहेत का?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ न दिल्याबद्दल शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘राज्यपाल हे राजकीय पक्षाचे आमदार व नेत्यांना भेटतात. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही. मग दाद मागायची कुठे?, राज्यात सरकार नाही. सर्व प्रशासकीय अधिकार राज्यपालांकडं आहेत. ते शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नसतील तर त्यांनी सूत्रे हातात का घ्यायची? ते फक्त राजभवनात बसण्यासाठी आहेत का,’ असा सवालही शेट्टी यांनी केला.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

राज्यपालांनी तात्काळ राज्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करावी

शेतकऱ्यांना तातडीनं २५ हजार रुपयांची मदत द्यावी

शेतकऱ्यांची सर्व देणी माफ करून टाकावी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हरयाणात भाजप ‘उदार’… १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती

Next Post

बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत

बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us