मुंबई : राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरु असून पावसामुळे उत्सवात खोळंबा होण्याची शक्यता आहे. आधीच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
परतीचा पाऊस सध्या राजस्थानात आहे. हा पाऊस अपक्षितपणे पुढे सरकलेला नाही. त्यामुळे आजपासून त्याची वाटचाल सुरू होईल. परतीचा पाऊस हा महाराष्ट्रात पुढील महिन्यात ५ ऑक्टोबरपर्यंत दाखल होणार आहे. पण एकूणच वेग पाहता विलंब होण्याची अधिक शक्यता आहे. हवामन खात्याने याबाबत माहिती दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात विजांसह पाऊस पडेल. तर शनिवारी कोकण, मध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे पण वाचा :
भारतीय संघाला मोठा धक्का ; T20 वर्ल्ड कपमधून अनुभवी वेगवान गोलंदाज बाहेर
चालत्या ट्रेनमध्ये चोरी करणं महागात पडलं, चोराला खिडकीला लटकवलं, मग….पहा Video
411 रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळेल 66 लाखाचा परतावा ; जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबाबत?
LPG साठी नवीन नियम, ग्राहकांना वर्षभरात फक्त 15 गॅस सिलिंडर मिळणार ; महिन्याचा कोटाही निश्चित
महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी ही माहिती दिली आहे.