मुंबई -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर शिवसेनेने लगेचच आपणास सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
शिवसेनेच्या वतीने अॅड. सुनील फर्नांडिस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेने नेते अॅड. अनिल परब यांनी या माहितीस दुजोरा दिला.