जळगाव : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असून याबाबत शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. मात्र, यावरून राज्यात अनेकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अशातच शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीचा शिंदे गटावर काय परिणाम होणार नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील जळगावात बोलताना म्हणाले की, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही काम करत आहोत. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
हे पण वाचा :
घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच लग्न, पण यानंतर जे घडलं ते भयंकरच..
आता स्वस्तात घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार, सिमेंट, सळईचे भाव घसरले
Video : अबब.. अभियंत्याच्या घरावरील छापेमारी सापडली ‘इतक्या’ कोटीची रोकड
बिथरलेला बैल अचानक छतावर अन् ५० फूट खाली कोसळला ; घटनेचा थरारक Video व्हायरल
पाटील म्हणाले की, प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. काम करणाऱ्या लोकांवर कुठलाही फरक पडत नाही असं म्हणत शिंदे गटावर या युतीचा कुठलाही परिणाम होणार नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जनता ही काम करणाऱ्यांना महत्व देत असते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.