जळगाव, दि : २५ ऑगस्ट- जळगाव शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, जळगाव शहरात खड्डे आहेत की खड्ड्यात जळगाव अशीच परिस्थिती पाहायला मिळत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्याच्या विधानसभेचेने पावसाळी अधिवेशन सुरु असून अखेर जळगाव शहरातील खड्डे या मुद्यावर शहराचे आमदार यांनी खड्डेमुक्त जळगाव शहरासाठी निधीची मागणी आज केली.
आज दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार श्री.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी शहरातील विकास कामे त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, असा प्रश्न उपस्थित करून निधीची मागणी केली आहे.
तसेच या पूर्वी मागणी केलेल्या एकूण १३० कोटी निधीची मागणी मंजूर करण्यात यावी. मागील काळात मंजूर १०० कोटी निधी पैकी उर्वरित ५८ कोटी निधी लवकरात लवकर मिळावा.त्याचबरोबर जळगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी शहरात नवीन MIDC टाऊनशिप करिता मंजुरी द्यावी. जळगाव शहरातील महत्वाच्या समस्या सोडविणे बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक आयोजित करावी, असा प्रश्न उपस्थित केला.