मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना फैलावर घेतले. सोशल मीडियाचा वापर जरुर करावा. पण सोशल मीडियावर पक्षातील पक्षात कोणी एकमेकांवर कॉमेंट केल्या तर त्याला मी एक क्षणही पक्षात ठेवणार नाही.
आजपर्यंत मी तुमचे खूप चोचले पुरवले. आतापर्यंत झालं ते खूप झालं. तुम्हाला सोशल मीडियावर तुमच्या कामाबद्दल काही सांगायचे असेल तर सांगा. पण तुम्हाला एकमेकांची उणीदुणी काढायची असतील तर ती काढून बघाच. असे प्रकार कुठे सुरु असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा, असेही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले.
हे पण वाचा :
महिलेसोबत अश्लिल कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला कॉन्स्टेबल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित
मोठी बातमी : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता घटनापीठासमोर
चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूससह दोघे जेरबंद
उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंनी दिले ‘हे’ संकेत
यावेळी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी काही मुद्दे देखील मांडले. ते म्हणाले की, ‘चांगल्या क्षेत्रातील महिलांनी पुरुषांनी राजकारणात आलं पाहिजे. मी याबाबत एक पत्रं काढणार आहे. राजकारण खूप विस्तारलेलं आहे. फक्त निवडणुका ही गोष्टच नाही. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता आणि त्यासाठीच दोन दोन तास रांगेत उभं राहून मतदान करता. मग तुच्छ कसं. आपल्याकडे कीड लागली आहे. जातीच्या, धर्माच्या नात्याच्या नावाने मतदान करत असतो. आपल्या राज्याने देशाला मार्गदर्शन केलं. यूपी बिहारसारखं राजकारण आपल्या राज्यात घुसत आहे. सर्वांना मत मागणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्याविरोधात प्रचार करतात. स्लो पॉईजन देत आहेत. ते तिथेच छाटा.’