मुंबई : मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कारसमारंभ आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले मला अमिताभ बच्चन म्हटले. माझे शरीर अमजद खानसारखे आहे. पण हे मला अमिताभ बच्चन म्हणत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मागून कितने आदमी थे, असा आवाज आला, त्यावर ते म्हणाले, हे विचारू शकतो. कितने आदमी थे. 65 मे से 50 निकल गये. और सबकुछ बदल गया. अभी दोही बचे है, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. ते म्हणाले, दोनच राहिले पण त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांना सन्मान देतो. मला जो सन्मान मिळाला तो भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे. तुम्ही मेहनत केली. तुम्ही मला नेता बनवले. त्या यशाचा मान मला मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे पण वाचा :
मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर
75,000 रुपये भरून घरी घेऊन या ‘ही’ कार ; पाहा किती लागेल EMI
खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले..
आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत. पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सर्वांनी पाहिलं.” तसेच, काल दहीहंडी जोरात साजरी झाली. त्याचप्रमाणेच पुढील सणही जोरात साजरे करायचे आहेत, असं ते म्हणाले.