मुंबई : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत आज सकाळपासूनच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आक्रमक अंदाजात दिसून आले. या दरम्यान, भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना नेते भास्कर जाधव यांनी चांगलंच खडसावलं.
मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, म्हणत नितेश राणे यांना गप्प बसण्याची सूचना केली. मात्र एवढं करुनही नितेश राणे शांत व्हायला तयार नाहीत हे पाहून भास्कर जाधव चांगलेच संतापले. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हस्तक्षेप करावा. त्यानंतर दोघेही शांत झाले.
हे पण वाचा :
ATM: तुमची बँक मोफत मर्यादेपेक्षा किती शुल्क आकारते, लगेच जाणून घ्या
धक्कादायक ! झोपेत असलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं ओतलं उकळतं पाणी
यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायकच
ना. महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडून अश्या चुकीची अपेक्षा नव्हती, नेमक काय घडले सभागृहात?
अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाम सुरु होऊन जेमतेम २० मिनिटे झाली होती, तोच लक्षवेधीवरुन भास्कर जाधव यांनी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. माझ्या लक्षवेधीची मला उत्तरं मिळणार कधी, मला ती उत्तरं वाचून त्यावर प्रश्न विचारायचे आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. त्यावर फडणवीसांनी मिश्किलपणे, “भास्करांना वाचायची गरज काय, पाहिलं तरी तुम्हाला लगेच कळतं…”, असं म्हणत गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न केला.