नवी दिल्ली : तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतले असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता बँका कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुमच्याकडून जबरदस्तीने कर्ज वसूल करू शकत नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सर्व बँका आणि वित्तीय संस्थांसाठी एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. या आदेशात बँकांना धमकी देणे, त्रास देणे, बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या वैयक्तिक डेटाचा गैरवापर करणे अशा घटना थांबविण्यास सांगण्यात आले आहे.
बँकांनी कर्जदारांच्या नातेवाईकांना, अगदी ओळखीच्या व्यक्तींनाही त्रास देण्याच्या घटना थांबवाव्यात, असेही यात म्हटले आहे. RBI चे हे परिपत्रक सर्व व्यावसायिक बँका, सर्व बिगर बँक वित्तीय कंपन्या, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि सर्व प्राथमिक नागरी सहकारी बँकांना लागू आहे.
अशा घटना पसरू नयेत
आमच्या संलग्न वेबसाइट झी बिझनेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आरबीआयने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, बँका आणि इतर संस्थांनी देखील आक्षेपार्ह संदेश पाठवणे, सोशल मीडियावर बदनामी करणे या घटना थांबवाव्यात. खरेतर, अलीकडच्या काही महिन्यांत, कर्ज अॅप्सच्या प्रकरणांमध्ये वसुली एजंटांकडून मनमानी आणि जबरदस्ती केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या नवीन परिपत्रकात आरबीआयने असेही म्हटले आहे की, नियमांनुसार, ग्राहकांना रिकव्हरीसाठी (आरबीआय न्यू सर्कुलर फॉर रिकव्हरी एजंट) सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर बोलावले जाऊ नये. यासह आरबीआयने असेही म्हटले आहे की संस्थांनी वसुली एजंट्सकडून नियमांचे योग्य पालन करावे. ग्राहकांना त्रास देऊन त्यांच्याकडून वसुली करू नका.
हे पण वाचा :
धक्कादायक ! झोपेत असलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं ओतलं उकळतं पाणी
यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायकच
ना. महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडून अश्या चुकीची अपेक्षा नव्हती, नेमक काय घडले सभागृहात?
खात्यात पैसे नाहीत, तरीही तुम्ही काढू शकता 10,000 रुपये! कसे ते जाणून घ्या
आरबीआयने कडकपणा दाखवला
खरं तर, आरबीआयने परिपत्रकात सल्ला दिला आहे, ‘बँका किंवा संस्था किंवा त्यांचे एजंट कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळ करू नयेत. त्यांच्या कर्जाची वसुली करण्याच्या प्रयत्नात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध शाब्दिक किंवा शारीरिक कृत्यांचा वापर करणार नाही. आरबीआयने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर ग्राहकांकडून तक्रार असेल तर आम्ही ती गांभीर्याने घेणार आहोत.