जळगाव: राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.गिरीश महाजन यांचे पहाटे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
शिंदे-फडणवीस सरकारने विस्तारात ओबीसींवर अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी पलटवार करत टीकास्त्र सोडले आहेत. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही. आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.
यावेळी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवरही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आता जबाबदारी मोठी आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. आता डबल इंजिनचं सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
हे पण वाचा :
..आता याबाबत शंका, मंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंनी दिला हा सल्ला
नात्याला कलंक! पतीच्या निधनानंतर मोठ्या दिराचा अत्याचार, पीडित महिला गरोदर, अमळनेर हादरले
या सरकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या पगार पाणीसह पात्रता?
अधिवेशनापूर्वीच खाते वाटप
मंत्रिपदे दिली, पण खाती वाटप कधी होणार? असा सवाल महाजन यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खाते वाटप लवकरच होणार आहे. अधिवेशन समोर असल्याने त्यापूर्वीच खाते वाटप करण्यात येईल, असं ते म्हणाले.