नवी दिल्ली : महागाई आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. या निर्णयानंतर लागलीच खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने व्याजदरात वाढीचा निर्णय जाहीर केला.
ICICI बँकेने व्याजदरवाढी विषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ICICI बँक बाह्य मानक कर्ज दर म्हणजेच बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (I-EBLR) RBI च्या रेपो दरावर आधारीत आहेत. केंद्रीय बँकेच्या धोरणानुसार त्यात बदल होतो. रेपो दरात वाढ झाल्याने आयसीआयसीआय बँकेने कर्जावरील व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. I-EBLR आता वार्षिक 9.10 टक्के असून तो 5 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल असे बँकेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती दिली. त्यानुसार, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, 8 ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर (RLLR) 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. हा वाढीव दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल. रेपो दरावर कर्जाचे दर अवलंबून असतात. रेपोमधील कोणताही बदल झाला की त्यानुसार दर वाढतो किंवा कमी होतो. बँका त्याआधारे कर्जावरील व्याजदरात बदल करतात.
हे देखील वाचा :
सोन्याचा भाव महिनाभराच्या उच्चांकावर पोहोचला ; आता करावे का? तज्ञ म्हणाले..
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या भागांना ऑरेंज अलर्ट’
फोटोच्या नादात तरुण धबधब्यात वाहून गेला, अंगाला काटा आणणारा Video व्हायरल
जर तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर तुम्हाला LIC मध्ये मिळेल नोकरी, 53,620 रुपये पगार मिळेल
महागाई नियंत्रित करण्याचा प्रयत्न
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. किरकोळ महागाई दर सात टक्क्यांच्या वर कायम आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, जगभरातील महागाई विक्रमी पातळीवर आहे. भारत महागाईच्या उच्च दराचा सामना करत आहे. जून हा सलग सहावा महिना होता जेव्हा किरकोळ महागाईने रिझव्र्ह बँकेची वरची मर्यादा ओलांडली होती.