नवी दिल्ली : महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेना पक्ष नक्की कोणाचा या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. मात्र अद्यापही कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहेत. दरम्यान सोमवारी या प्रकरणात काय घडामोडी घडणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
तसेच आजच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाकडून शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल येईलपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा जीव भांड्यात पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आमदार आणि खासदारांचा गट करून निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.
हे पण वाचा :
जळगावसह 16 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी
बीचवर बिकिनी घालून या अभिनेत्रीने केला योगा, व्हिडिओ पाहून तुमचेही उडतील हौश
दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर.. ITBP मध्ये मोठी भरती, 69100 महिना वेतन मिळेल
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय
या पत्रात उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडल्याची माहिती देण्यात आली होती. जर निवडणूक आयोगाने नव्या कार्यकारिणीला मान्यता दिल्यास शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. मात्र आज निकाल येईलपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने शिवसेनाला मोठा दिलासा मिळाला आहे.