जळगाव : शहरात अमृत आणि भुयारी गटारी योजनेची कामे झाल्यामुळे जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या २.५ वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार च्या काळात जळगाव शहरात विकास कामांना अडथळा निर्माण झाला असून शहरात विविध विकास कामे ठप्प झालेली आहेत.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने आ.सुरेश भोळे यांनी रस्त्यांच्या कामांकरिता नुकतेच ०५ कोटी रुपये निधी मंजूर केला. त्याचबरोबर शहरात विविध विकासकामे व रस्त्यांची कामे करणेसाठी आ.सुरेश भोळे यांनी दि.१३ जुलै, २०२२ रोजी मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत १०० कोटी निधी मिळावा या मागणीचे पत्र दिले आहे.
हे पण वाचा :
Photo : अप्सरेच्या नव्या लूकचे फोटो पाहून चाहते घायाळ!
राज्य सरकारचा मोठा निर्णय : नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार
मोठी बातमी ! शिंदे सरकारकडून पेट्रोल-डिझेल दरात कपातीची घोषणा, इतक्या रुपायांनी स्वस्त होणार
स्टंटबाजी करणं भोवले ; गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता
सदरचा निधी उपलब्ध झाल्यास शहरात अनेक विकास कामांना चालना मिळेल व शहराचा चेहरा मोहरा बदल्यासाठी मदत होईल आणि नागरिकांना समस्यांपासून दिलासा मिळेल.