जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : – केंद्र शासनाने खरिप हंगाम-2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुबंई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2022 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतक-यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम-2021 मध्ये राबवण्यिात येत आहे. योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे.
खरिप ज्वारी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 480 रुपये,
बाजरी- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
सोयाबीन- विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 720 रुपये,
भुईमुग- विमा संरक्षित रक्कम 32 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 640 रुपये,
तीळ- विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 440 रुपये,
मुग- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
उडिद- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
तुर- विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 500 रुपये,
कापुस- विमा संरक्षित रक्कम 40 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 2 हजार रुपये,
मका- विमा संरक्षित रक्कम 26 हजार 200 रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 524 रुपये इतका असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगाम 2022 करीता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2022 आहे. शेतकऱ्यांनी 31 जुलै, 2022 अंतिम मुदतीची वाट न पाहता आज पासुनच पिकाचा विमा काढण्यात यावा. जेणेकरुन शेवटच्या दिवशी घाई होणार नाही. जन सुविधा केंद्रावर विनामुल्य अर्ज स्विकारले जाणार आहेत. नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
या योजनेच्या लाभासाठी संपर्काचे ठिकाण
आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, कार्यालय, जळगाव, पाचोरा, अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालय आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत, जळगाव, आपले सरकार सेवा केंद्र, सर्व (सी.एस.सी केंद्र) जिल्हा जळगाव, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट मुंबई, -400023,. टोल फ्री क्रमांक 1800 419 5004, ई – मेल pikvima@aicofindia.com. श्री. कुंदन बारी, जिल्हा प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्र. 9595554473 येथे संपर्क साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर www.maharastra.gov.in उपलब्ध आहे.