जळगाव : बकर्या घेऊन जाणार्या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्या ट्रकने उडविले. या भीषण अपघातात 5 जण ठार झाले तर सहा जण जखमी झाल्याची घटना महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याच्या पुढे असणार्या उड्डाणपुलाजवळ घडली. या अपघातानं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रागा यावेळेस पहावयास मिळाल्यात.
याबाबत असे की, फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्या घेऊन जाणार्या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्या ट्रकने उडविले. जळगाव आणि नशिराबाद येथून बकर्या भरून एक एमएच ४३ एडी : १०५१ क्रमांकाचे बोलेरो पीकअप वाहन फैजपूर येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणार्या उड्डाणपुलाजवळ समोरून (भुसावळकडून ) भरधाव वेगाने येणार्या एमएच ०९ एचजी : ९५२१ क्रमांकाच्या ट्रकने रॉंग साईडला येऊन या वाहनाला जोरदार धडक दिली.
हे देखील वाचा :
चाळीसगाव येथील सहाय्यक फौजदारासह पोलिस नाईक ४ हजाराची लाच स्वीकारतांना ‘ट्रॅप’
उद्या बहुमत चाचणी ; ठाकरे सरकारची अग्नी परीक्षा ; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
10वी पास आहात का? संरक्षण मंत्रालया नोकरीची संधी..असा करा अर्ज
यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात पाच जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातानं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रागा यावेळेस पहावयास मिळाल्यात.