मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद विधान परिषदेच्या 10 जागाांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल हाती आले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यातल्या त्यात खास विजय आहे तो भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंचा. त्यामुळे आता खडसे पुन्हा एकदा करणार विधानभवनात एंट्री केली आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेरीस दोन तासांच्या विलंबानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. 285 आमदारांची मत वैध ठरली आहे. एकाही आमदाराचे मत बाद झाले नाही. निकालाचा पहिला कल हाती आला असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विजयी झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रामराजे निंबाळकर हेही विजयी झालेले आहेत.
पण ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी आणि एकूणच इतर पक्षांसाठीही लक्षात राहिल ती एकनाथ खडसेंमुळे. कारण खडसेंच्या विजयाचे अनेक राजकीय कंगोरे आहेत. त्यांना पाडण्यासाठी भाजपानं जंग जंग पछाडलं पण त्याला खडसे पुरुन उरल्याचं दिसतंय. भाजपात झालेल्या कोंडीमुळे खडसेंनी वर्षभरापूर्वी भाजपा सोडली आणि राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीनं खडसेंचं नाव टाकलं पण अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. खडसेंची प्रतिक्षा कायम राहिली. शेवटी त्यांचा राजकीय उपयोग पाहून राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवलं आणि त्यात ते यशस्वी झाले.