मुंबई : राज्यात मान्सून दाखल होऊनही पावसाने दमदार हजेरी लावली नाहीय. त्यामुळे राज्यातील शेतकरी अद्यापही दमदार पावसाची अपेक्षेत आहेत. दरम्यान अशातच राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत असून राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ (yellow alert)चा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मान्सून पोहोचला असल्याचीही माहिती देण्यात आली.
यंदा मान्सूनला विलंब झाला असला तरी काही भागात मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांना याचा आधार मिळाला आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय असला तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात पाऊस पाडण्यात अपयशी ठरतो आहे. मात्र, 19 जूनपासून परिस्थितीत किंचित बदल होत असून, पंधरा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सूनने गुजरात राज्यात प्रवेश केला.
हे पण वाचा :
आमदार संजय सावकारेंना ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील
खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने
बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली तीव्र झाल्यामुळे हा पाऊस होत आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ वेद प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर आणि त्याच्या लगतच्या भागात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे, तर माळवा-निमारमध्ये दोन दिवस पाऊस हुलकावणी देण्याची शक्यता आहे. भोपाळमध्येही मान्सून 18 तारखेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.