नवी दिल्ली : देशात कोरोना पुन्हा थैमान घालत आहे. मागील काही दिवसापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे देशवासीयांची चिंता पुन्हा वाढली आहे. न्देशात कोरोनाचा संसर्ग कमी व्हायचं नाव घेत नाही. कोरोनाचा कहर संपला असं वाटत असताना आता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शक्रवारी दिवसभरात 4165 नवीन रुग्णांची नोद झाली आहे. तर दिल्लीमध्ये 1797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 68 हजार 108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर 0.16 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात कोरोना महामारी सुर झाल्यास आतापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख 90 हजार 845 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.
हे पण वाचा :
आमदार संजय सावकारेंना ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील
खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने
गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा
सलग तीन दिवस महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चार हजारापार
महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसापासून रुग्णसंख्या ही चार हजारपार जात आहे. शुक्रवारी राज्यात 4165 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 2255 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.