मुंबई : निम्मा जून संपत आला तरी जूनच्या मासिक अंदाजावरून राज्यात जून महिन्यात अति आक्रमक पाऊस पडेल असं दिसत नाही. मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला असला तरी मान्सूनने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
यंदा पाऊस चांगला होणार असून गत आठवड्यापासून १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसांतच मान्सूनने सुट्टी टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
मान्सूनच्या या ब्रेकमुळे शेतकऱ्यांनाही पेरणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरंतर, येत्या ४८ तासांत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पण सध्या मान्सूनला लो करंट आहे. म्हणून पाऊस पडण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची गरज आहे. पण तसं होत नसल्याने सध्या मान्सूनने विश्रांती घेतली आहे.
२९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. यावेळीही मान्सूनने दहा दिवसांचा ब्रेक घेतला. हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून शुक्रवारी वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाला. पण रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस बेपत्ता झाला असून, मुंबईत तर कडाक्याच्या उन्हामुळे उष्णता वाढत आहे.
हे पण वाचा :
हृदयदायक : पदवीच पाहिलंच वर्ष अन् नियतीने रचला डाव, दोन जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी अंत
ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, केली ‘ही’ विनंती
रिया चक्रवर्ती शेअर केले सुशांतसोबत घालवलेल्या रोमँटिक क्षणांचे फोटो
राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली नाही? फडणवीसांनी केलं पहिल्यांदाच भाष्य
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली येत्या ५ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.