मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय आला असून शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत अपक्षांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे.
अपक्ष आमदारांबाबत काही बोलायचं नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा अपमान करायचा नव्हता, असं सांगतानाच दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला वारंवार फोन जात होता. कुणाची मते बाद करायची आणि कुणाची नाही याचे निर्देश दिले जात होते, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
हे पण वाचा :
बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??
गिरीश महाजनांचे पीए अरविंद देशमुखांनी जिंकली १ लाखाची पैज, पण..
ठरलं तर..! १३ जूनपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस, वेस्टर्न रेल्वेची घोषणा
केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर
सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना भाजपवर गंभीर आरोप केले. अपक्ष आमदार काही करणार नाहीत. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही आमदारांचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही काय बोलतो हे त्यांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे. आमच्या हातात दोन दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असं संजय राऊत म्हणाले.