जळगाव : राज्यातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडली असून निवडणुकीचा निकालही हाती लागला आहे. यात भाजपने तीन जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक एक एक जागा जिंकली. राज्यसभेचा जागा सहा उमेदवार सात. त्यामुळे कुणीतरी एक हरणार, हे नक्की होतंच. दरम्यान, जळगावात लागलेल्या या पैजेची राज्यभर चर्चा रंगली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार जिंकणार असं सांगत भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी चॅलेंज केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लाखांच्या पैजेचं आव्हानही दिलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं. मात्र राहुल पाटील पैज हरले. त्यामुळे राहुलने आज शनिवारी दुपारी एक लाख रुपयांचा धनादेश अरविंद देशमुख यांना देण्यासाठी गिरीश महाजनांच्या जी. एम. फाउंडेशन या कार्यालयात आणला होता. पण अरविंद देशमुख यांनी एका कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश राहुल पाटलांना परत केला. अरविंद देशमुख आणि राहुल पाटील यांच्यातल्या पैजेची राज्यभर चर्चाही रंगली होती
हे पण वाचा :
ठरलं तर..! १३ जूनपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस, वेस्टर्न रेल्वेची घोषणा
केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर
सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय ; शिवसेना उमेदवाराचा पराभव
अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती
राज्यसभेच्या सहा जाणांचा निकाल, कुणाच्या वाट्याला किती जागा?
भाजप – 3
शिवसेना – 1
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी काँग्रेस – 1