मुंबई । शुक्रवारी राज्यातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल मध्यरात्री लागला. या निवडणुकीमध्ये सर्वांचे लक्ष लागून असलेल्या ६ व्या जागेवर भाजपने बाजी मारत शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहेत. सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला.
दरम्यान, या निवडणुकीतील निकालाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीच्या निकालामुळे धक्का बसलेला नाही. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसं करणं त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही, असे पवार यांनी म्हंटले.
राज्यसभेच्या निकालानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला स्वतःला निकालाने फार धक्का बसला असे काहीही नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर मविआच्या उमेदवारांना जो कोट दिला त्यात काही कमी पडला नाही. सहावी जागा जी शिवसेनेने लढवली त्यात मतांची संख्या अगोदरच कमी होती, भाजपची संख्या जास्त होती. तरीही आम्ही धाडस केले. पण त्यात अपयश आले. अपक्षांची संख्या आमच्याकडे कमी होती.
हे पण वाचा :
सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय ; शिवसेना उमेदवाराचा पराभव
अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती
रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त
भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष आमदार होते त्या अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी खेळी केली त्यात त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. बाकी महाविकास आघाडीच्या संख्येप्रमाणे मतदान झालं आहे त्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसे करणे त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही, असे पवार यांनी म्हंटले.