मुंबई : मागच्या कित्येक दिवसापासून मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा लागून राहिली होती. ती अखेर आज (दि.10) संपली. नैऋत्य मान्सून कोकणात आज दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात मान्सून लांबणीवर पडणार अशी चर्चा सुरु असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (imd) या सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. असे सांगण्यात आले आहे.
अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी पुढे सरकारली आणि आज अखेर मान्सून कोकणात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, तसेच संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात दाखल झाला आहे.
हे पण वाचा :
जळगावात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज फैसला ; मतदान प्रक्रिया सुरू
शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात मान्सून दाखल झाला ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी मान्सूनची वाट बघत होते. अखेर मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी हवामान विभागानं पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कारण कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर रुळावर आली असून मान्सून आज कोकणात दाखल झाला आहे.