मुंबई : राज्यात मान्सून लांबणीवर पडला असला तरी अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, मुंबई आणि उपनगरे, नागपूर, यवतमाळ, नाशिक, बुलढाणा, वाशिम, यासह अन्य जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
दरम्यान यामुळे अनेक जिल्ह्यात गावांमध्ये शेतीच्या कामे खोळांबली आहेत तर काही भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान सोलापूर, नाशिक, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, या जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य केळी या पिकाला मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर केळीच्या बागा वादळी पावसाने उन्मळून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जोरात होता. या तडाख्यातच दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावासाने एन्ट्री केली. जवळपास आरद्या तासाच्या पावसाने पाणी पाणी झाले होते. वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामांना वेग आला आहे.
नागपूरच्या काही भागात रिमझिम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली. सकाळ पासून कडक उन्ह मात्र दुपार नंतर पावसाचे वातावरण झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.