मुंबई : विधान परिषेदसाठी भाजपनेत्या पंकजा मुंडे याना उमेदवारी मिळेल, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे भाजप विरोधात मुंडे समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
“महाराष्ट्रात भाजप हा मारवाडी आणि ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात. ज्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपला महाराष्ट्रात ओळख प्राप्त करून दिली आज त्यांच्या मुलीला भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे, असे खडसे यांनी म्हंटले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर खडसेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात भाजपचे स्थान आहे, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्रात भाजपचा पाया रुजवला, पक्षाचा विस्तार केला. याउलट ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ज्यांचं काही योगदान नाही, अशा लोकांना उमेदवारी भाजपने दिली असून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली नाही. ज्यांनी आपले उभे आयुष्य पक्षासाठी खर्ची केले, त्यांना बाजूला ठेवले जाते, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला.
हे पण वाचा :
इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल
जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज
विधान परिषद निवडणूक : अखेर एकनाथ खडसेंचे राजकारणात पुनरागमन, राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
बारावी पास झाल्याने मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला, अन्..
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा
शरद पवारांनी मला संकटाच्या काळात साथ दिली
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानले. भाजपमध्ये मला अडगळीत टाकण्यात आले होते. अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने व शरद पवार यांनी मला साथ दिली. त्यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझे राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांशी प्राामाणिक राहणे, ही माझी भूमिका असेल, असे खडसे यांनी म्हटले.