पुणे : मान्सूनबाबत एक महत्वाची बातमी आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवर अडकून आहे. त्यामुळे भारतात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता असून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी जूनचा पहिला आठवजा उजाडण्याची शक्यता आहे,
दरम्यान सोमवारी मुंबईसह उपनगरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. यानंतर आज मंगळवारी मुंबईसह उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.
मुंबईतील इतर भागात तसेच ठाणे, पालघर, डहाणू, नाशिक, पुण्यात दिवसा ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे. पण हा मान्सून नसल्याचीच माहिती हवामान खात्यानं दिली आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीतील अनेक जिल्ह्यांमध्येही काही दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. याशिवाय नागपूर चंद्रपूरमध्येही ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
भारतातील केरळ राज्यातून मान्सूनला खरी सुरूवात होते. मात्र यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर कोकणमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे देशातील मान्सूनचे आगमन लांबले आहे.
हे पण वाचा :
कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा
खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे
27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज असून 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. याशिवाय 12 जून ते 15 जूनदरम्यान मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.