पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “माझ्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा विरोध झाला. मी अयोध्येला गेलो असतो तर माझ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते. म्हणून मी गेलो नाही. आमच्या मनसे सैनिकांनी आंदोलने केली. मात्र, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? हे सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तर शरद पवार यांना टोला लगावला.
संभाजीनगरचे नामांतर झालं, नाही झालं फरक पडत नाही. मी बोलतोय ना. तू कोण आहेस? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रात सरकार होते. आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जिवंत ठेवायचा आहे. याच गोष्टी फक्त यांना करायच्या आहेत. मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिले त्यांना.
कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि पोलीस भगिनींना घोळका करून त्यांच्या अब्रूवर हात घालण्यात आला. बाहेरचे मुसलमान तिथे आले होते. त्याच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. बाकी कुणी नाही काढला. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
हे पण वाचा :
भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर
घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण
सुवर्णसंधी.. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे 105 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
जामनेर तालुक्यातील तरुणाचा नकली नोटा छापण्याचा पराक्रम; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले
बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, हताश पतीने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास
निवडणुका नाहीत मग उगीच कशाला भिजत भाषण करायचं
यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला. ते म्हणाले की, आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करायांचे, असा टोला राज ठाकरेंनी पवारांना लगावला.