कधी होऊ शकते भरती….
राज्य सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात ७० हजार ते ९० हजार पदांची भरती जाहीर करू अशी माहिती आहे.मागील सहा वर्षांत मोठी पदभरती झालेली नसल्याने या पदभारतीची नोकरीची शोध घेणारे युवक प्रतीक्षा करीत आहे.
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
राज्याच्या गृह विभागात जवळपास १८ हजार, जलसंपदा विभागात १५ हजार, पशुसंवर्धन, कृषी, मराठी राजभाषा विभाग, महसूल, भूमीअभिलेख, पुरवठा विभाग, शिक्षण अशा विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली आहे. वित्त विभागाने पदभरतीवरील सर्व निर्बंध उठविले असून आता सर्व विभागांनी त्यांच्याकडील मंजूर व रिक्तपदांच्या आकृतीबंधास मान्यता घेऊन पदभरती सुरु करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान, एकूण रिक्तपदांच्या ५० टक्के पदभरती होईल,आता आकृतीबंधास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ही पदभरती अपेक्षित आहे.
राज्यातील सरकारी पदांची स्थिती
एकूण मंजूर पदे
११,५३,०४२
भरलेली पदे
८,७४,०४०
रिक्त पदांची संख्या
२,०६,३०३
वेतनावरील एकूण खर्च
१.३१ लाख कोटी