जळगाव : शेतकरी आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसतेय. अशातच ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे सोमवारी सायंकाळी घडलीय. प्रमोद भागवत पाटील (वय-३७, रा. तरडी ता. धुळे) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रमोद भागवत पाटील हे आपल्या पत्नी व मुलासह आव्हाणे ता. जळगाव येथे वास्तव्याला होते. लहानपणीच आईवडीलांचे निधन झाल्याने ते आव्हाणे येथे मामाच्या गावाला रहायला आले होते. ते शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. अक्षयतृतीयेनिमित्त पत्नी आरती या मुलगा मनीषसोबत माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे प्रमोद हा घरी एकटाच होता.
हे पण वाचा :
सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट ; रेल्वेचा हा नवा नियम वाचा एकदा…
चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई
राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक
सोमवारी १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. पाटील यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहे. प्रमोद भागवत पाटील त्याच्या पश्चात त्यांची पत्नी आरती, मुलगा मनीष आणि मोठा भाऊ गजानन असा परिवार आहे.