बिहार : दोन मुलांना सोडून विवाहितेने प्रियकरासह पळ काढला. बिहारमधील बगहा येथे हा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या जाण्याने पती इतका अस्वस्थ झाला आहे की, तिला परत आणण्यासाठी त्याने गावकरी आणि पोलिसांकडे विनवणी सुरू केली आहे. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. हे प्रकरण बगहा येथील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील पंचफेडवा येथील रहिवासी असलेल्या ओमप्रकाश रावचे असून तो जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतो
पती कामासाठी जयपूरला गेला होता, तर घरी परतल्यावर त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. यानंतर तो इतका नाराज झाला की, पोलीस ठाण्यापासून ते डीएसपी आणि एसपी कार्यालयापर्यंत त्याच्या फेऱ्या मारू लागल्या.
हे पण वाचा :
अरे वा! आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, कसे जाणून घ्या?
जगाची डोकेदुखी वाढणार ! ‘झिरो कोविड केस’चा दावा करणाऱ्या देशात पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
अखेर संभाजीराजेंची मोठी घोषणा, निवडणुकीबाबत म्हणाले..
पीडित ओम प्रकाश याने नौरंगिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पत्नीच्या प्रियकराला अटक करण्याची पोलिसांकडे मागणी केली. पत्नीने ५० हजारांची रोकड आणि दोन लाखांचे दागिने घेऊन फरार झाल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ओमप्रकाश म्हणतो की तो त्याच्या दोन मुलांसह एकटा राहिला आहे, त्याची पत्नी आणि त्याच्या प्रियकराला शिक्षा झाली पाहिजे.
ओम प्रकाश यांनी सांगितले की, पत्नीला परत बोलावण्यासाठी त्यांनी चार वेळा एसपीकडे अर्ज केला आहे. मात्र कारवाई होत नसल्याने तो नाराज आहे. आता ओमप्रकाश यांनी डीआयजींकडे अर्ज करून न्यायाची मागणी केली आहे. कापड कारखान्यात काम करणाऱ्या ओमप्रकाशच्या व्यथा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनल्या.