बीड : बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटला असून अशातच जिल्ह्यातील हिंगणगावमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून दिला. इतकेच नाही तर त्यानंतर ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
नामदेव आसाराम जाधव रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड असं गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. नामदेव जाधव यांना एकूण 2 एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊन देखील, परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता.
हे पण वाचा :
रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने केली मोठी घोषणा, लवकरात लवकर लाभ घ्या
राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर?
घ्या आता ! शिंपल्याचा बिकिनी अन अर्धनग्न उर्फी ; Video पाहून चाहते भडकले
गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी, नामदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होते. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली, यामुळे नैराश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत, फडातिलचं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.