मुंबई : शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शिक्षकांचे वेतन वेळेवर करण्याचे निर्देश दिले आहे.
ते म्हणाले की, राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी विलंब होणे चुकीचे आहे. शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते.
या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणातील त्रुटींमुळे वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि वित्त विभागाने समन्वयाने काम करावे, यंत्रणांमधील त्रुटी दूर करुन आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.