नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह गैरभाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे भाजपविरोधात एकत्र या, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी या पत्रातून केलं आहे.
देशात सूडाचं राजकारण सुरू आहे. त्यानुसार ईडी, सीबीआय, आयबी, इन्कम टॅक्ससह विविध यंत्रणांचा राजकीय वापरासाठी चुकीचा वापर होत आहे, असं सांगत या प्रकारावर ममता बॅनर्जी यांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक होण्याची गरज आहे. या बैठकीतल पुढील वाटचाल आणि रणनीतीवर चर्चा केली गेली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळताना दिसत आहेत.
WB CM-TMC chief Mamata Banerjee writes to all Oppn leaders & CMs, "expressing concern over BJP's direct attacks on democracy"
'I urge that all of us come together for a meeting to deliberate on the way forward at a place as per everyone's convenience & suitability,' letter reads pic.twitter.com/OvlV2W4yo6
— ANI (@ANI) March 29, 2022
ममता बॅनर्जी यांनी 27 मार्च रोजी हे पत्रं लिहिलं आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने आज हे पत्रं मीडियासमोर आणलं. या पत्रातून तपास यंत्रणाचा होणाऱ्या गैरवापरावर चिंता व्यक्त करतानाच हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लवकरच एक बैठक बोलवून त्यात पुढील रणनीती आखली पाहिजे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.