मुंबई : देशातील उत्तर प्रदेशसह, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. दरम्यान, निवडणुकांचे चित्र स्पष्ट होताच, राज्यात भाजपने युपी आणि गोव्यात निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. ”ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है,” चा नारा अशा घोषणा भाजपचे नेते, कार्यकर्ते देऊ लागले आहेत यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे.
‘यूपी किंवा इतर राज्यांतील निकालामुळं महाराष्ट्रात कुठलाही मोठा बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही वर्षे थांबावं लागेल, असं पवार म्हणाले. ‘हा निकाल लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष अधिक जबाबदारीनं कष्ट घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
हे देखील वाचा :
MPSC मार्फत 224 जागांसाठी मोठी पदभरती ; त्वरित करा अर्ज
रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता आरक्षणशिवाय करता येणार रेल्वे प्रवास
Video ! उर्फी जावेदने पुन्हा दाखवली बोल्ड स्टाईल आणि म्हणाली..’मी आवरा’, मग चाहते म्हणाले- कडक!
युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाची मोठी घोषणा, ‘या’ निर्णयामुळे आता सोने होणार स्वस्त
विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळं राज्यात ईडी आणि सीबीआयच्या धाडी वाढतील असं वाटतं का, असंही पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, ‘तो कार्यक्रम सुरूच आहे. त्याला तोंड द्यावं लागणार आहे. पण हे सरकार सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.