समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? अस वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले होते, औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले होतं त्यावर महाविकास आघाडीने ठीक ठिकाणी आंदोलन केल्याचे दिसून आले दरम्यान आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांच्यावर टीका केली असून त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ”हर राज्य में राज्यपाल होता है, महाराष्ट्र में ‘भाजपाल’ है|”
राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, माफी मागण्याबाबत केलेल्या प्रश्नावर राज्यपाल कोश्यारी यांनी बगल देत त्यावर बोलणं टाळलं.
राज्यपाल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहेत. माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असं स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वीच दिलं आहे.
हर राज्य में राज्यपाल होता है, महाराष्ट्र में 'भाजपाल' है|
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2022
गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे”, असं कोश्यारी म्हणाले. मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं असे कोशारी यांनी म्हंटल होतं.
ते पुढे म्हणाले, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.