जळगाव । रशिया-युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच असून यात अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहे. तर काही विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील १९ विद्यार्थी युक्रेनला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून त्यात 5 विद्यार्थी भारतात परतले. तर ६ सीमेलगत आहेत तर ६ सुरक्षित आणि मार्गावर आहेत. दरम्यान, दोघांचा मोबाईल बंद असल्याचे समजते. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
हे विद्यार्थी परतले स्वगृही
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निकीत आमले, शोएब राशीद काकर, सुरज शिंदे, देवांग किशोर वाणी, बरीरा युसूफ पटेल हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. यापैकी काही विद्यार्थी आपल्या स्वगृही देखील पोहचले आहेत.
हे विद्यार्थी हंगेरीजवळ
सौरभ विजय पाटील, ओम मनोज कोल्हे, मुस्कान रामशंकर जैस्वाल, श्रद्धा आनंद धोनी, लोकेश विजय निंभोरे, क्षितिजा गजानन सोनवणे हे विद्यार्थी पोलंड सीमेलगत आणि हंगेरीजवळ आहेत.
तसेच विजय दिलीप परदेशी, प्रसन्ना संजीव निकम, कल्याणी छगनराव पाटील, रोहन सुनील चव्हाण, यश राजेंद्र परदेशी, शिमा फतेमा शेख अन्सार हे विद्यार्थी सुरक्षित आहे. यश हा होस्टेलच्या भूमिगत बंकरमध्ये आहे.
या दोन विद्यार्थ्यांचा मोबाईल बंद
जिल्ह्यातील निलेश योगराज पाटील, सुमित सुरेशचंद्र वैश्य या दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद आहेत. .