भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘महाड सत्याग्रह ‘ केला होता त्या सत्याग्रहाच्या वेळी सर्व प्रथम ‘जय भवानी’ अशी घोषणा देण्यात आली होती.म्हणजेच जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. एवढंच नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचे चित्र होते, व जय भवानी अशी घोषणा देखील होते. आपण जर हे पहिल्यास लक्षात येईल.
परळच्या दामोदर हॉल येथे डॉ.बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज,म.फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या.महाड सत्याग्रहाच्यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती.
बाबासाहेबांचे नातू यांनी ट्विट केले ‘ते’ लेटरहेड…
जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती. तसेच बाबासाहेबांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचे चित्र होते याबाबत बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून डॉ. आंबेडकरांनी त्या काळी लिहिलेली काही पत्रेही दाखला म्हणून शेअर केली आहेत. दरम्यान, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी ॲड. आंबेडकरांच्या विधानाला दुजोरा दिला.
आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे.असं म्हणत “जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून सांगितलं आहे तर अपूर्ण माहिती शिवाय बोलणाऱ्यांना आंबेडकरांनी ‘ठेकेदारांनो जरा वाचायला शिका… असा सल्ला दिला आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे.
"जय भवानी" ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
१/३ pic.twitter.com/xw3mugLF1s
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 19, 2022