पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या मन की बातसाठी नागरिकांना आपले विचार आणि सूचना कळविण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
“या महिन्याचा #MannKiBaat कार्यक्रम येत्या 27 तारखेला होणार आहे. नेहमीप्रमाणे, मी तुमच्याकडून तुमचे विचार समजून घेण्यास उत्सुक आहे. या सूचना तुम्ही MyGov, NaMo ॲपवर लिहून पाठवा किंवा 1800-11-7800 वर फोन करा आणि तुमचा संदेश रेकॉर्ड करा.”