मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन त्यांनी पंतप्रधान यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा असं म्हटलं आहे. व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी हे ट्विट केलं आहे.
नाना पटोले यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज उत्तर प्रदेशातील जनता मतदान करणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नाते आई आणि मावशीचे आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा या नात्याचा अपमान केला आहे. हा अपमान लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश.
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1493081092336730112
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे भाजपने माफी मागावी यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज काँग्रेस भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहे.
नाना पटोले यांनी स्वत: याबाबत घोषणा केली. पण त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील भाजप नेते देखील आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने खरंत हिंमत असेल तर फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाला येऊन दाखवावे, त्यांना भाजप कार्यकर्ते प्रत्युत्तर देतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला.