जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध शौक्षणिक शुल्क वाढीला व्यवस्थापन परिषदेच्या बौठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली तथापि खानदेशातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ही शुल्कवाढ पुढील शौक्षणिक वर्षापासून अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवार दिनांक 4 जून रोजी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बौठक झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील 101 (3) अन्वये विविध पाठ¶क्रम किंवा अध्ययनक्रम यांचे शिकवणी शुल्क व इतर शुल्क आकार ठरविण्यासाठी विद्यापीठाने सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.एन.एन.मालदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने आपला अहवाल विद्यापीठाला सादर केला. तत्पूर्वी समितीने विविध विद्यार्थी संघटनांशी देखील चर्चा केली होती.
मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बौठकीत या समितीच्या अहवालावर चर्चा झाली. या शुल्क वाढीला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली मात्र खानदेशात सध्या दुष्काळ असल्यामुळे विद्याथ्र्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडू नये यासाठी ही शुल्कवाढ शौक्षणिक वर्ष 2020-2021 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या या बौठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा होवून मान्यता देण्यात आली. व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्रा.नितीन बारी, प्रा.मोहन पावरा, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ.जितेंद्र नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल, बी.पी.पाटील, एस.आर.गोहिल आदिंनी चर्चेत भाग घेतला. कुलसचिव भ.भा.पाटील यांनी आभार मानले.