जळगाव,(प्रतिनिधी)- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पार्टी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महा विकास आघाडी चे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे पूर्ण झाले आहे. दोन वर्षापूर्वी निमित्त सरकारने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडला असून राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणार कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी देत आहे. 2 वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची… ही टॅगलाईन वापरून 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस च्या बोगी वर दोन्ही बाजूंनी महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे. आज दि.८ रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस जळगाव येथून रवाना झाला आहे.
सामान्य नागरिकांना या योजणांची माहिती व्हावी व या योजणांचा लाभ नागरिकांना घेता यावा म्हणून महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीने रेल्वेच्या माध्यमातून प्रसिद्धी करत आहे. योजणांची माहिती रेल्वेच्या दर्शनी भागावर असल्याने नागरिकांना देखील सहज लक्षात येऊन वाचता येत आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात त्यामुळे नागरिकांना यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजना माहिती होतील.
#2वर्षे_जनसेवेची_महाविकास_आघाडीची#जळगाव येथून 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस जाताना.. या रेल्वेवर दोन्ही बाजूंनी महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे. @CMOMaharashtra @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
@GulabraojiP @InfoDivNashik @JalgaonDM @AamchJalgaon pic.twitter.com/Vgjxt1YzRd— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) February 8, 2022