मुंबई,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे 12 निलंबित आमदारांच्या प्रकरणावर आज मे.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सुनावणी दरम्यान मे.सुप्रीम कोर्टानं निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.यामुळे पुढील तारखेच्या सुनावणीला या 12 आमदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मे. सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं
आमदारांचे निलंबनकरणं हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय आहे, मात्र जरी असे असले तरी देखील आमदारांचे 60 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने मत नोंदविले आहे.
या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 18 जानेवारी 2022 रोजी आहे.या दिवशी न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.निलंबित आमदारांची बाजू मांडतांना युक्तिवाद करतांना या आमदारांच्या वकिलांनी सांगितलं की,मुळात ज्या पद्धतीने भाजपाच्या आमदारांचे निलंबन झाले, तो प्रकारच चुकीचा होता. ते विधानभवनाच्या प्रथा परपंरांना धरून नव्हते, आमच्यावर केवळ राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यात आलेल्याचे सांगण्यात आले.
भाजपाच्या आमदारांना विधानसभेबाहेर ठेवण्याचा हा खोडसाळ डाव होता, आम्ही नियमाला धरून विधिमंडळाकडे गेलो होतो, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही त्यानंतर आम्ही याविरोधात न्यायालयाकडे दाद मागितली. विधिमंडळात नाही मिळाला तर सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.न्यायालयात तब्बल पाच तास युक्तिवाद झाला.