पुणे: राज्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अशातच लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. जिथे काही प्रॉब्लेम नाहीय तिकडे लॉकडाऊनचा विषय नाही. 40 टक्क्यांच्यावर बेड्स भरल्यानंतर लॉकडाऊनचा विचार करणार, मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता 10 टक्केही बेड्स भरलेले नाहीत, असं टोपेंनी सांगितलं.
केंद्राचा निधी वेगळ्या कामासाठी खर्च करणार
केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार यांच्यासोबत आजच माझी बैठक होती. केंद्राने जो निधी दिलाय तो वेगळ्या गोष्टीसाठी खर्च होणार आहे, आणि तो वेळेत कसा खर्च होईल याकडे आमचं लक्ष आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवसापासून कठोर निर्बंध लागू करावे, लागतील असा इशाराही त्यांनी दिला होता.