अहमदनगर : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थिती अहमदगरमध्ये शातील पहिली सहकार परिषद पार पडली. दरम्यान, यावेळी अमित शहा यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये एवढे मोठे घोटाळे कसे झाले? ते कोणी केले? हे घोटाळे काय रिझर्व्ह बॅंकेने केले का ? याचा विचार करा,’ असं म्हणत अमित शहा यांनी पहिल्याच सहकार परिषदेत राज्यातील सहकार क्षेत्रातील नेत्यांवर नाव न घेता आगपाखड केली.
देशातील सहकारात काम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी प्रवरानगरच्या या भूमीत यायला हवे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सहकार मंत्रालय स्थापन करण्याचे कोणाला सुचले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा निर्णय घेतला. हे खाते मला मिळाले. तेव्हा महाराष्ट्रातील या क्षेत्रातील नेत्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या, असं अमित शहा म्हणाले.
मला आनंद आहे कि सर्व साखर कारखाने खाजगीकरण होत असताना प्रवरा साखर कारखाना अजूनही सहकारी तत्वावर सुरू आहे हि आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. मी सहकारमंत्री बनल्यावर अनेक फ्रश्न उपस्थित झाले. मी सहकारमध्ये काही तोडण्यासाठी आलेलो नाहीये तर जोडण्यासाठी आलो आहे. मात्र, राज्य सरकारनेही राजकारण बाजुला ठेवून सहकार क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.