भारतात प्रवासी वाहतुकीचे सर्वात मोठे जाळे असणारे रेल्वे नेहमीच आपल्या कोट्यावधी प्रवाशांसाठी नेहमीच काही नवीन सेवा सुरु करत असते. अनेकांना रेल्वे प्रवास सुखाचा व सुरक्षित वाटत असल्याने रेल्वे प्रवासाला पसंती देतात, रेल्वे विभागानं प्रवाशांसाठी आता एक नवा ‘नियम’ लागू केला आहे.या नियमाचे पालन न झाल्यास प्रवाशांना ६ पट दंड भरावा लागणार आहे.
काय आहे नवा नियम…
रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवासी असलेल्या एका व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त सामान नेले तर या पुढे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंतच सामान नेऊ शकता.रेल्वेच्या नियमांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान काही सामान नेण्यास मनाई आहे. हे सामान घेऊन ट्रेनमध्ये गेल्यास दंडासह तुरुंगात जावे लागू शकते.
आता प्रवासी किती सामान घेऊन जाऊ शकता?
विमान प्रवासाप्रमाणेच आता रेल्वेमध्येही प्रवासादरम्यान सामान नेण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेकडून कडक नियमही करण्यात आले आहेत. या नियमानुसार, प्रवासी जास्तीत जास्त 50 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो.
जर एखाद्या प्रवाशाकडे यापेक्षा जास्त सामान असेल तर रेल्वेच्या नियमांनुसार त्याला त्याचे चार्ज वेगळे द्यावे लागेल. जर प्रवासी वातानुकुलीत कोचमध्ये प्रवास करत असतील तर ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ७० किलोपर्यंतचे सामान सहजपणे वाहून नेऊ शकतात.त्याच वेळी, स्लीपरमध्ये प्रवास करणारे प्रवासी त्यांच्यासोबत ४० किलोपर्यंतचे सामान ठेवू शकतात. जर तुम्ही यापेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
प्रवासादरम्यान जर एखाद्या प्रवाशाने निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सामान नेले तर त्याला वेगळे शुल्क भरावे लागेल. प्रवाशांना किमान 30 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय रेल्वेने या नियमात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. उदा.जर एखादा रुग्ण ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर रेल्वेच्या नियमानुसार असे प्रवासी ऑक्सिजन सिलिंडर आणि स्टॅन्ड घेऊन जाऊ शकतात.
या वर बंदी….
रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशांना स्फोटके किंवा ज्वलनशील पदार्थ सोबत नेण्याची परवानगी नाही, तसे केल्यास प्रवाशांना मोठा दंडही भरावा लागतो. इतकेच नाही तर यासाठी प्रवाशाला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.