केंद्र सरकारने PM किसान योजनेची आता कडक नियमवाली जारी केली आहे.दरम्यान शेतकऱ्यांना PM किसान योजने अंतर्गत पुढील दोन हजाराचा हप्ता आपल्या बँक खात्यावर विना अडचण जमा करून घ्यायचा असल्यास आता e- KYC पूर्ण करावी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. आता 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान 10 व्या हप्त्याची 2 हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. त्यापूर्वी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना सोपं होईल अशा पद्धततीने घर बसल्या आपली
e-KYC पूर्ण करता येणार आहे. e-KYC करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. याकरीता सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत संकेतस्थाळावर जावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला वेगवेळे टॅब दिसतील यामध्ये सर्वात वरती eKYC असं लिहलेले दिसेल. यावर क्लिक करायचे आहे. यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर मात्र दिलेला इमेज कोड टाकून सर्च बटनावर क्लिक करायचे आहे. यानुसार तुमचा e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन वर्ग करते. गेल्या 5 वर्षापासून या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये जे नागरिक या योजनेसाठी पात्र नाहीत असेही लाभ घेत असल्याचे निदर्शनास येताच नियमांची अंमबजावणी केली जात आहे. तर ज्यांनी कागदपत्रांचा गैरवापर करुन योजनेचा लाभ घेतला अशा नागरिकांकडून पैसे वसुल केले आहेत.