पाचोरा(प्रतिनीधी)— राञीची सुरू असलेल्याल्या चोरट्या रेती वाहतुकीला वेळिच आळा न घातल्याने २४ तारखेच्या पाहटे शहराबाहेरिल वृंदावन हाॅस्पिटलसमोर ट्रॅक्टरच्या झालेल्या विचिञ अपघातात वडगाव आंबे येथील आकाश शांताराम सोनवणे वय २५ याचे अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे आंबेवडगाव गावावर शोककळा पसरली आहे.तर हा अपघात नेमका झाला कसा? कोणी केला? खरा आरोपी कोण? यासह अनेक प्रश्न अनुउत्तरित असुन या घटनेमुळे गांधारीची भुमिका घेतलेल्या महसुल व पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रनालिवर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत पाचोरा पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती की,आंबेवडगाव येथिल पवन विजय वाघ यांनी फिर्याद दिली आहे की,मयत आकाश शांताराम सोनवणे याच्या ताब्यातिल ट्रक्टर MH -19 CZ 8949 रेती भरून रेल्वे उडाण पुलावरून उतारावर वेगाने चालवित घेउन येत असतांना सदरचे ट्रॅक्टर हे पल्टी झाल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली दाबला गेल्यामुळे त्यास डोक्यास जबर मार लागल्याने तो मयत झाला आहे.या प्रकरणी पाचोरा पोलिसात भाग 05 गुरनं 498/2021 भादवी कलम 304(अ),279,427,338 व मोटर वहान कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तर पुढिल तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे हे करित आहे.
मयत आकाशा सोनवणे परिवारातील करता व कमावता मुलगा असल्याने आज रोजी हे कुटुंब उघड्यावर आले आहे. विशेष म्हणजे आकाश हा काम करून शिक्षण घेत होता. भविष्यात कुठेतरी नोकरी लागेल या अपेक्षेने तो पोलिस किंवा सैन्य भरतीत जाण्यासाठी दररोज व्यायाम, व अभ्यास करत होता. दिवसा काम व रात्री अभ्यास करणारा होतकरू मुलगा यांचे अपघाती निधन झाल्याने गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चोरटी रेती वाहतुक करणार्या या ट्रॅक्टरमुळे आज एका कुटुंबातिल कर्ता तरूण गतप्राण झाला आहे.ही बातमी शहरात सकाळी जेंव्हा वार्यासारखी पसरली तेंव्हा मयत आकाश सोनवणे हा ट्रॅक्टर चालवत नव्हता तर पवन वाघ हा ट्रॅक्टर चालवत होता. आणी ट्रॅक्टरचा अपघात हा टायर फुटल्याने झाला आशाच चर्चेला उधान आले होते. तर पोलिसात पवन वाघ हा फिर्यादी आणी मयत आकाश सोनवणे हा आरोपी असल्याचे नोंद करण्यात आले आहे.या प्रकरणी सत्यता तपासणे गरजेचे असुन ज्या मार्गाने हे ट्रॅक्टर आले त्या मार्गावरिल सर्वच सी.सी. टी.व्ही.कॅमेरे चेक करणे अपेक्षित आहे.पोलिसांना फिर्यादिने दिलेल्या फिर्यादिची सत्यता पडताळल्यास सत्यता समोर येउन सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळेल.